विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने लोकसहभागातून उभारलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा हे सामाजिक संस्थांचे एकात्मतेचे चांगले दर्शन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सरकार्यवाह सुरेश सदाशिव उपाख्य, भैयाजी जोशी यांनी केले.
भयाजी जोशी लातूर दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी लोकसहभागातून उभारल्या गेलेल्या स्वामी विवेकानंद पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. रा. स्व. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे विभाग संघचालक डॉ. अशोक कुकडे, डॉ. राजेश पाटील आदी उपस्थित होते. भयाजी जोशी यांनी कन्याकुमारीनंतर लातुरात लोकसहभागातून उभारलेल्या या प्रकल्पात योगदान दिलेल्या सर्वाचे कौतुक केले. कन्याकुमारीतील प्रकल्प देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. शहरातील हा प्रकल्प सामाजिक संस्थांचे एकात्मतेचे चांगले दर्शन आहे. या आगळय़ावेगळय़ा कामातून माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळत राहील. अनेकांना मार्गदर्शक ठरणारे हे काम आहे,  असे ते म्हणाले. संस्थेचे अॅड. संजय पांडे यांनी स्वागत केले.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत