सांगली : सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्याकडून राख खुल्या वातावरणात पसरत असून प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता कृष्णा नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे होत असलेल्या जल व वायू प्रदूषणामुळे मानवी आणि जलचर प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून, योग्य व्यवस्था केली नाही तर परवान्याचे नूतनीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली.

हेही वाचा >>> साताऱ्यातील जलाशयात ‘परदेशी पाहुणे’ दाखल; रोहित, पट्टेरी राजहंससह ५० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

second title fight of Maharashtra Kesari will also be held in Ahilyanagar
‘महाराष्ट्र केसरी’ची दुसरी किताबी लढतही अहिल्यानगरमध्येच रंगणार!
Ahilyanagar district A gold crown weighing two kg Ancient temple goddess Jagdamba
अहिल्यानगर : जगदंबा देवीला दोन किलो वजनाचा सोन्याचा…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
firing incident Gurudwara area ​​Nanded morning gate
नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले, एकाचा मृत्यू, गुरुद्वारा गेट क्र.६ भागातील घटना
Sangameshwar leopard story in marathi
संगमेश्वर हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला
bee attack during hike at pandavgad in satara
पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला; सहा जखमी दोन बेशुद्ध
Chhagan Bhujbal On Pankaja Munde
Chhagan Bhujbal : “…तर वेगळा पक्ष उभा राहील”, पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एका समाजावर पक्ष…”
Asha Bhosle Said This Thing About Eknath Shinde
Asha Bhosle : आशा भोसलेंनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, “बाळासाहेब ठाकरेंनी एकट्याने शिवसेना घडवली तशी…”
acknowledged personalities in hingoli honored with gratitude
हिंगोलीत अमृततुल्य व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा गौरव सोहळ्यात जागर

दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्याचा गाळप हंगाम सध्या सुरू असून, कारखान्यातून राख हवेत पसरत असून, याचा परिणाम नागरिकांवर होत आहे. परिसरात, घरात, अन्नात राख मिसळत असून, कारखान्याने राख प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक असताना केलेला नाही. तसेच दूषित पाणी नाल्याद्वारे कृष्णा नदीत मिसळत आहे. यामुळे जलचर प्राणीही मृत्युमुखी पडत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संमतीचे नूतनीकरण न करता कारखाना नोव्हेंबरपासून सुरू आहे. प्रदूषणामुळे नागरी जिवितास धोका उत्पन्न झाला असून, याची तातडीने दखल घेऊन उचित कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांना आज देण्यात आले असल्याचे श्री. फराटे यांनी सांगितले.

Story img Loader