कॉमेडिअन कपिल शर्मा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रेयसी गिन्नी छत्रतसोबत विवाहबंधनात अडकला. अमृतसरमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. विवाहानंतर कपिलनं मित्रपरिवारासाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत घडलेला मजेशीर किस्सा कपिलनं नुकताच आपल्या कार्यक्रमात सांगितला.

‘रिसेप्शन पार्टीदरम्यान एक अनोळखी माणूस पार्टीत शिरला. तो स्टेजवर आला आणि त्यानं माझ्या गालाचा मुका घेतला. या धक्क्यातून सावरल्यानंतर मला कळलं की या व्यक्तीला मी ओळखत नव्हतो. ना त्याच्याजवळ रिसेप्शन पार्टीचं आमंत्रण होतं. हे लक्षात अल्यावर मी पटकन त्याला कोपऱ्यानं ढकललं. त्यानं तिथून पळ काढला. त्यानंतर मला तो कधीही दिसला नाही’ असा मजेशीर किस्सा कपिलनं सांगितला.

कपिलनं अमृतसरमध्ये मित्रपरिवारासाठी १४ डिसेंबर रोजी रिसेप्शन पार्टीच आयोजन केलं होतं. त्यानंतर २४ डिसेंबररोजी मुंबईत कपिलनं बॉलिवूडसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळाली. लग्नानंतर कपिलनं द कपिल शर्मा शोमार्फत छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.