छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या जवळपास २६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मालिकेत नवे रंजक वळण आले. संजना आणि अनिरुद्ध लग्नबंधनात अडकले. त्यापाठोपाठ आता एका नव्या बालकलाकाराची मालिकेत एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच संजना आणि अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले. अनेक अडचणींनंतर संजना आणि अनिरुद्ध एकत्र आले आहे. अप्पांनी घराचा अर्धा हिस्सा अरुंधतीच्या नावावर केल्यामुळे अरुंधती देखील देशमुख कुटुंबीयांसोबत राहताना दिसत आहेत. संजनामुळे घरात सतत वाद होत असतात. दरम्यान आता मालिकेत नवे वळण आले आहे.

Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संजनाच्या मुलाची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळते. निखिल हा संजना आणि शेखरचा मुलगा आहे. शेखर काही दिवसांसाठी निखिलला संजनाकडे आणून सोडतो. आता निखिलमुळे संजना आणि अनिरुद्धच्या नात्यात दुरावा निर्माण होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.