आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आजकाल बरेच स्टारकिड्स अभिनय क्षेत्रात पदार्पण करू लागले आहेत. पण एक स्टारकिड अशी आहे, जी भविष्यात देशाच्या राजकारणात सर्वांत महत्त्वपूर्ण स्थान मिळवू शकते. ती स्टारकिड म्हणजे, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या. ती भविष्यात देशाची पंतप्रधान होऊ शकते, असं आम्ही नाही तर प्रसिद्ध ज्योतिषी डी. ग्यानेश्वर म्हणत आहेत.

तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी आणि थलैवा रजनिकांत राजकारणात प्रवेश करतील ही आपली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा हैदराबादचे प्रसिद्ध ज्योतिषी ग्यानेश्वर यांनी केला आहे. रविवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी अशाप्रकारे बरीच भविष्यवाणी केल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. २०१९च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुनर्निवड, तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी रजनिकांत यांची निवड आणि २०२४मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध होणार असल्याची भविष्यवाणी या प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञांनी केली आहे.

Gold Trailer : एक स्वप्न.. ज्याने देशवासियांना एकत्र आणलं

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्याचं राजकारणात उज्ज्वल भविष्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण त्यासाठी तिला तिचं नाव बदलावं लागेल असंदेखील त्यांनी सुचवलं आहे. आराध्या हे नाव बदलून रोहिनी असं ठेवल्यास भविष्यात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो असं ग्यानेश्वर म्हणाले.