गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी कपल लग्न बंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर कधी लग्न बंधनात अडकणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ते दोघे २०२०मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता आलियाने यावर वक्तव्य करत लग्नाच्या चर्चांना पूर्ण विराम लावला आहे.

नुकताच आलियाने ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आलियाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘सगळेजण मला का विचारतात की मी लग्न कधी करणार? तुम्हा सर्वांना माहिती आहे मी २५ वर्षांची आहे आणि आता लग्न केले तर थोडी घाई केल्यासारखं होईल’ असे आलिया म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

आलिया आणि रणबीर हे बॉलिवूडमधील चर्चेत असणारे कपल आहे. ते दोघे २०२०मध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता ते २०२१मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. रणबीर आणि आलिया प्रत्येक कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावताना दिसतात.