बॉलिवूडमधल्या दोन आघाडीच्या अभिनेत्री एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असूच शकत नाही असं म्हटलं जातं. अशी अनेक उदाहरणं बॉलिवूडमध्ये आहेत पण काही तितक्याच जिवलग मैत्रिणीदेखील आहेत. आतापर्यंत बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींपासून चार हात लांब राहणारी कतरिना आलिया भट्ट आणि जॅकलिनच्या जवळ होती. आलियानं विश्वासघात केल्यानंतर कतरिनानं तिच्याशी संपर्क न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आलियासोबतच्या मैत्रीत दूरावा आल्यानंतर आता जॅकलिनसोबतही वादाची ठिणगी उडाली आहे.

सध्या कतरिना, जॅकलिन, सोनाक्षी, डेझी शहा आणि अन्य काही स्टार सलमानच्या ‘दबंग टूर’चे भाग आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कतरिना जॅकलिनला टाळायचा प्रयत्न करत आहे.  एकाच हॉटेलमध्ये राहूनही या दोघींही एकमेकांपासून लांब राहणं पसंत केलं आहे. या दोघींमध्ये भांडण होऊ नये यासाठी सलमाननं मध्यस्थी करत असल्याचं पिंकव्हिलानं म्हटलं आहे. जॅकलिन आणि कतरिना सलमानच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तर कतरिनाचं नाव पूर्वीच सलमानशी जोडलं गेलं. त्यामुळे या दोघींमधला वाद कमी करण्याचा प्रयत्न सलमान करत आहे. या दोघींमधल्या वादाचं कारण अद्यापही कळलं नाही.

दंबग टूरसाठी कतरिना सर्वाधिक मानधन देण्यात आलं आहे. कतरिनाला १२ कोटी तर जॅकलिनला ६ ते ८ कोटींचं मानधन देण्यात आलं आहे. त्यामुळे कदाचित हेही कारण असू शकतं असं म्हटलं जात आहे.