यंदाचे बिग बॉस पर्व ही महिला स्पर्धकचं जिंकेल अशी आशा बिग बॉस ९ मधून बाहेर पडलेला अभिनेता अमन वर्माने व्यक्त केली. यंदाच्या पर्वात कोणीही पुरुष स्पर्धक बिग बॉस जिंकण्यासाठी योग्य नसल्याचे त्याचे मत आहे.
किश्वर मर्चण्ट, मंदाना करिमी आणि रॉशेल राव या तिघीजणी अंतिम फेरीपर्यंत जाण्याची शक्यता अमनने व्यक्त केली आहे. अमन म्हणाला की, मंदाना आणि किश्वर या दोघी जिंकण्यासाठी योग्य स्पर्धक आहे. मंदाना ही मानसिकदृष्टया खूप खंबीर आहे पण ती नेमक्यावेळी कुठेतरी कमी पडते. तर किश्वर ही बोलताना आपण काय बोलत आहोत याचा विचार नाही करत. तिने अशा काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत ज्या तिच्याच विरुद्ध फिरल्या. रोशेल ही खूप चांगला गेम खेळतेय. पण मुलांचं बोलाल तर मला त्यांपैकी कोणी जिंकेल असं नाही वाटतं. तसेच अमन शांत मार्गी स्वभाव तो बिग बॉसमधून बाहेर पडण्याचे कारण असल्याचे अमनचे म्हणणे आहे. तो म्हणाला, इथे मी एक धडा शिकलोय, तुम्ही जर किंचाळलात, इतरांशी वाईट वागलात किंवा शिवीगाळ केलात तरचं तुम्ही बिग बॉसमध्ये राहू शकता.