बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही काळात ‘फिल्मफेअर’ या पुरस्कारामुळे चर्चेत आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराने अनन्याला सन्मानित केले गेले. ‘स्टूडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला ‘फिल्मफेअर’ देण्यात आला. यावरुन तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. अनेकांनी तर ‘फिल्मफेअर’ या पुरस्कारावरच बहिष्कार टाकला होता. या सर्व प्रकरणावर अनन्याने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली अनन्या पांडे?

“लहानपणापासूनच मी ‘फिल्मफेअर’ पुरस्कार जिंकण्याची स्वप्ने पाहात होते. पाच वर्षांची असताना मी अभिनय शिकण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी मी हातात पाण्याची बाटली पकडून आरश्यासमोर उभी राहायची आणि अभिनय करायची. आज माझे ते स्वप्न स्वप्न पूर्ण झाले. टीकाकारांना मी काहीच बोलू इच्छित नाही. कारण त्यांचे काम टीका करणं आहे व माझं काम उत्तम अभिनय करण आहे असं मला वाटतं.” अशा शब्दात अनन्याने टीकाकारांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रत्युत्तर दिले.