विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा लोटला आहे. मात्र, नवं सरकार कोणाचं? या प्रश्न अजून सुटलेला नाही. भाजपा शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रेटारेटी सुरू आहे. त्यामुळे युतीचा तोडगा लांबणीवर पडत चालला आहे. दरम्यान, नायक सिनेमातून मुख्यमंत्र्याची भूमिका करणाऱ्या अभिनेता अनिल कपूरला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रातील तिढा सुटेपर्यंत मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अनिल कपूर पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान मत व्यक्त केले आहे.