सध्या केवळ आणि केवळ क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाचीच चर्चा आहे. एकावेळी केवळ ४४ लोकांना राहण्याची परवानगी असलेल्या आलिशान अशा Borgo Finocchieto रिसॉर्टमध्ये हा पंजाबी विवाहसोहळा काल झाला. इटलीतील टस्कनी येथील Borgo Finocchieto हे आठशे वर्षांपूर्वी वसलेले गाव आहे. काही वर्षांपूर्वी जॉन फिलिप्स याने या गावाचा कायापालट केला. एकेकाळी बराक ओबामा आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवण्यासाठी याच ठिकाणी थांबले होते. मात्र, ऐतिहासिक वारसा लाभलेले हे ठिकाण विराट – अनुष्काला लग्नासाठी कोणी सुचवले असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असेल.

VIDEO : ‘बिदाई’च्या वेळी भावूक झाली अनुष्का

सुत्रांच्या माहितीनुसार, अनुष्काचा गुरु आणि निर्माता, दिग्दर्शक आदित्य चोप्रा यानेच विराटशी लग्न करण्यासाठी इटलीतील हे ठिकाण तिला सुचवल्याचे कळते. २०१४मध्ये आदित्यने प्रसारमाध्यमांना कानोकानी खबर लागू न देता राणीशी तेथेच विवाह केला होता. त्यामुळे स्वतःच्या अनुभवावरूनच त्याने अनुष्काला सल्ला दिला असावा.

वाचा : मुंबईत विराट-अनुष्का पुन्हा करणार लग्न

भारतात पारंपरिक पद्धतीने लग्न करताना फोटोग्राफर्स आणि पाहुण्यांच्या गर्दीमुळे अनेक अडथळे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही इटलीत लग्न करा असे आदित्यने अनुष्काला सांगितले होते. आपल्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये आदित्यचा सल्ला घेणाऱ्या अनुष्काला त्याचे म्हणणे पटले, अशी माहिती सुत्रांनी दिली. या शाही लग्नाचे आदित्य आणि राणी मुखर्जीला आमंत्रण होते. मात्र, आगामी ‘ठग्स ऑफि हिंदोस्तान’च्या चित्रीकरणात आदित्य व्यस्त असल्याने तो लग्नाला जाऊ शकला नाही.