टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ मध्ये आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गौर ही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते. अविका गौर ही तिच्या फॅन्ससोबत कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमधल्या गोष्टी शेअर करत असते. गेल्या वर्षी अविका गौर आणि मनिष रायसिंघन यांच्या रिलेशनशीपबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता ते दोघेही त्यांच्या ‘सिक्रेट चाईल्ड’मुळे चर्चेत आले आहेत. अविका गौर आणि मिलिंद चांदवानी या दोघांचं एक ‘सिक्रेट चाइल्ड’ असून त्यांनी चे गुपित ठेवलं असल्याचं देखील बोललं जातंय.

अभिनेत्री अविका गौरसोबत आरजे सिद्धार्थ कन्नन बोलत असताना अविका गौरला या ‘सिक्रेट चाइल्ड’बद्दल विचारलं. यावर उत्तर देताना अविका गौर म्हणाली, “हे अशक्य आहे…आम्ही दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आहोत आणि कायम राहू….माझ्या आयुष्यात त्यांचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. वयाच्या १३ वर्षापासून ते माझ्या खूप जवळचे मित्र आहेत…मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. ते माझ्यापेक्षा १८ वर्षांनी मोठे आहेत. आजुनही लोक आमच्या दोघांमधल्या नात्याबद्दल विचारत असतात. तेव्हा तेव्हा मी सगळ्यांना सांगते की ते माझ्या वडिलांपेक्षा थोडे लहान आहेत.” यापुढे ती बोलताना म्हणाली, “सुरवातीला जेव्हा आमच्या नात्याबद्दल बातम्या येऊ लागल्या, त्यानंतर आम्ही दोघांमध्ये अंतर ठेवू लागलो. आम्ही दोघांनी बोलणं बंद केलं होतं. पण तरीही आमच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरूच होत्या. मग आम्ही विचार केला की आम्ही दोघांमध्ये अंतर ठेवूनही जर त्याच चर्चा होत आहेत. मग आम्ही पुन्हा एकमेकांशी बोलू लागलो. आता आमच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या पाहून आम्हाला हसू येतं.”

मनिषची पत्नी सुद्धा या दोघांना भेटली होती त्यावेळी तिला सुद्धा ते दोघे कपल असल्याचं वाटलं होतं, असा खुलासा देखील मनिषने एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर त्याने पत्नी संगीताला सुद्धा दोघेही चांगले मित्र-मैत्रिणी असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सुद्धा दोघांच्या केमिस्ट्रीवर टिका करण्यात आल्या. मनिषने सुद्धा दोघे मित्र-मैत्रिणी असल्याचंच सांगितलंय. आतापर्यंत अनेकदा हे दोघेही त्यांच्या मैत्रीबद्दलच स्पष्टीकरण देताना दिसून आले.