‘बजरंगी भाईजान’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांमुळे माझ्यातला निरागसपणा परतेल, असा आशावाद अभिनेता सलमान खानने व्यक्त केला आहे. मी या चित्रपटांसाठी फारशी तयारी केली नव्हती. या चित्रपटांतील भूमिका साकारण्यासाठी प्रामाणिकपणा आणि निरागसपणाची गरज होती. गेल्या काही काळात मी या दोन्ही गोष्टींपासून दुरावलो होतो. मात्र, आता या चित्रपटांमुळे माझ्यातील निरागसपणा पुन्हा पहायला मिळेल, असे सलमानने सांगितले. यावेळी सलमानने काश्मीरमध्ये चित्रीकरण करतानाचे अनेक अनुभवही सांगितले. काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव माझ्यासाठी अद्भुत होता. आपल्या देशात काश्मीरसारखी सुंदर जागा असताना आपण तिकडे चित्रीकरण करत नाही, याला आपला मुर्खपणा कारणीभूत आहे का, असा सवालही सलमानने यावेळी उपस्थित केला. भारत-पाक संबंधावर आधारित असलेला सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान खानबरोबर करिना कपूर, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांच्याही भूमिका आहेत.

humsaath-saath-hai