टीव्हीवर सर्वात जास्त टीआरपी कमवत असलेला कोणता कार्यक्रम असेल तर तो तारक मेहता का उल्टा चष्मा हा आहे. पण लवकरच एक व्यक्तिरेखा या मालिकेतून काढता पाय घेणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या कलाकारांमध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टप्पू ही व्यक्तिरेखा साकारणारा भाव्य गांधी जो या मालिकेत गेल्या आठ वर्षांपेक्षाही अधिक काळ काम करत आहे. पण आता तो ही मालिका सोडणार आहे. डेली भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच भाव्य हा तारक मेहता ही मालिका सोडणार आहे. आठ वर्षांपासून या मालिकेत काम केल्यानंतर आता त्याला दुसऱ्या क्षेत्रात आपला अभिनय तपासून पाहायचा आहे. त्याने एक गुजराती सिनेमाही साइन केला आहे, त्याच्या चित्रिकरणासाठी त्याला गुजरातमध्ये जावे लागते.

ही मालिका सोडण्याचे दुसरे कारण म्हणजे सध्या या मालिकेत त्याला फारसे काम मिळत नाही. महिन्यातून फक्त ३ ते ४ दिवसांच्या चित्रिकरणासाठी त्याला बोलावले जाते. त्यामुळेच एक अभिनेता म्हणून त्याला आता अभिनयात नवीन प्रयोग करावेसे वाटत आहेत. त्यामुळे त्याचा या मालिकेचा करारही संपवला आहे.

टप्पू फेम भाव्यने टेलिचक्करला या बातमीबाबत दुजोरा देत म्हटले की, हो मी जानेवारी महिन्यातच ही मालिका सोडली आहे. आठ वर्ष आणि आठ महिन्यांचा हा प्रवास खूप फायदेशीर होता. मी तारक मेहता मालिकेतील संपूर्ण टीम आणि निर्माते असित मोदी यांच्यासोबतचा हा काळ खूप एन्जॉय केला. अगदी तसेच माझ्या चाहत्यांनीही मला खूप प्रेम केले. भविष्यातही माझ्या चाहत्यांनी एवढेच प्रेम करावे असे मला वाटते.
टीव्हीवरचा तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका फारच लोकप्रिय आहे. या मालिकेच्या एका महत्त्वाच्या व्यक्तिचे काही दिवसांपूर्वी सेटवरच अचानक मृत्यू झाला. अरविंद मारकंडेय हे या शोचे मुख्य प्रोडक्शन कंट्रोलर होते. ३० जूनला मालिकेच्या चित्रिकरणा दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा सेटवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर मालिकेच्या टीमने दोन दिवस चित्रिकरण बंद ठेवले होते.