अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी मुंबईमधील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांंबरोबरच बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मिडियावरुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. केवळ हिंदीच नाही तर प्रादेशिक भाषांमधील अनेक कलाकारांनी सोशल नेटवर्किंगवरुन सुशांतच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र एका अभिनेत्री राणी चॅटर्जीने एक पोस्ट शेअर करत सोशल मिडियावर अगदीच विचित्र पद्धतीने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या एका भोजपुरी कलाकाराला फैलावर घेतलं आहे.

राणी चॅटर्जीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका पोस्टरचा असून एका भोजपुरी गायकाने सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर एक गाणं बनवल्याचं यामधून दिसत आहे. हे पोस्टर पाहून राणीचा पारा चांगलाच चढला आणि तिने हे गाणं बनवणाऱ्याचा चांगलचं झापलं आहे. “या लोकांना काही लाज आहे की नाही? निर्ल्लजम लोकांना थोडी लाज वाटली पाहिजे. स्वत:च्या मेहनतीने नाव कमवा कोणाच्या मृत्यूचा फायदा घेऊन नाम कमवण्यात काय अर्थ आहे. असे लोकं कलाकारांच्या नावावर डाग आहेत. आता यावर कोणी भोजपुरी कलाकार काहीही बोलणार नाही. अशा लोकांमुळेच भोजपुरी चित्रपट हा हास्याचा विषय बनला आहे. आपण शांत राहतो त्यामुळे या लोकांना प्रोत्साहन मिळतं,” अशा शब्दामध्ये राणीने आपला संताप व्यक्त केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘सुशांत फसरी लगा लिहले’ असे शब्द असल्याचे गाणं बनवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या गाण्याचा शैल सिंह संगम याने आवाज दिल्याचेही पोस्टमध्ये दाखवण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

क्या शर्म बेच खाई है इन लोगो ने या कसम खाए है ? जाहिल शर्म करो बंद करो. अपनी मेहनत से नाम कमाओ ना की किसी के मौत का फायदा उठा कर … कलाकार के नाम पर धब्बा है ऐसे लोग अब देखो कोई भोजपुरी का एक्टर रिएक्ट नहीं करेगा ऐसे लोगो के वजह से जग हसाई होगी और हम शांत रहते है इसलिए इनका मन बढ़ रहा है ।#shamonyou

A post shared by Rani Chatterjee Official (@ranichatterjeeofficial) on

सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडलाही जबर धक्का बसला असून त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये डावलले जात असल्याच्या तणावामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांनी केला आहे. चित्रपटसृष्टीमध्येच आता घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.