छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या बिग बॉस १४ चं हे पर्व सध्या अत्यंत रंजक वळणावर असल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी झालेले स्पर्धक हे बऱ्याच वेळा त्यांच्यातील भांडणांमुळे चर्चेत येत असल्याचं दिसून येत आहे. यात एकीकडे कविता कौशिक आणि एजाज खान यांचं भांडण होताना दिसत आहे. तर दुसरीकडे एजाज आणि पवित्रा पुनिया यांच्यात प्रेमाचा अंकुर फुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पर्वातील स्पर्धकांवर अभिनेत्री काम्या पंजाबी व्यक्त झाली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, काम्या पंजाबीने या पर्वातील स्पर्धकांवर टीकास्त्र डागलं आहे. पवित्रा आणि एजाज यांच्यात जे काही सुरु आहे ते सारं ढोंग आहे असं ती म्हणाली आहे.”सध्या सगळीकडे एजाज आणि पवित्रा यांच्यातील नातेसंबंधांवर चर्चा होताना दिसत आहे. त्यावर काम्याने हे सारं कंटाळवाणं असल्याचं म्हटलं आहे. पवित्रा आणि एजाज यांच्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यात मला काहीच रस नाही. ते फार कंटाळवाणं आहे. या सगळ्या गोष्टी दोन दिवसांच्या आहेत. नंतर याचं काही होणार नाही. त्यामुळे हा कोणता ट्रेण्ड नाहीये, पण त्यातून डायरेक्ट एण्ड होईल”, असं काम्या म्हणाली.

आणखी वाचा- Video : एजाज-पवित्राच्या प्रेमाला बहर; ‘बिग बॉस’च्या घरात रंगली रोमॅण्टिक डेट

दरम्यान, काम्याने कविता आणि एजाज यांच्यातील भांडणावरदेखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना कविताचा शो पाहायला नसेल त्यांनी टीव्ही बंद करा. पण एजाज उगाच साळसूदपणाचा आव आणत असल्याचं दिसून येत आहे, असंही काम्या म्हणाली.