पुलवामा जिल्ह्यात तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली आहे. क्रीडाविश्वापासून ते कलाविश्वापर्यंत सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही या घटनेचा निषेध करत आपला संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. शाहरुख खान - अभिनेता शाहरुख खान याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासोबतच शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं म्हटलं आहे. Heartfelt condolences to the families of our valiant jawans. May the souls of our countrymen who laid their lives down for us rest in peace. #Pulwama — Shah Rukh Khan (@iamsrk) February 15, 2019 आमिर खान- मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान यानेदेखील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला मन विषण्ण करणारा आहे. I am heartbroken to read about the terrorist attack on our CRPF Jawans in Pulwama. It's so tragic. My heartfelt condolences to the families of the Jawans who have lost their lives. — Aamir Khan (@aamir_khan) February 15, 2019 लता मंगेशकर - पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करते. या भ्याड हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्तीला धक्का बसला आहे. या दु:खाच्या प्रसंगात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय एकटे नसून आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत, असं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. मैं हमारे शहीद वीर जवानों को कोटी कोटी प्रणाम करती हूँ। — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) February 16, 2019 राजकुमार राव - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर करण्यात आलेला भ्याड हल्ला हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. या प्रकरणी प्रत्येक आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. #PulawamaTerrorAttack is a heinous crime against humanity. My condolences go out to the families of our soldiers who have lost their lives. May our martyrs rest In peace and the perpetrators of the crime brought to justice. — Rajkummar Rao (@RajkummarRao) February 15, 2019 जान्हवी कपूर - पुलवामा हल्ल्यात आपले जवान शहीद झाले याचं दु:ख तर मला आहेच. पण त्याही पेक्षा त्यांनी लढण्याची संधी मिळाली नाही या गोष्टीचं सर्वात जास्त वाईट वाटतं. जर आपल्या जवानांना लढण्याची एक संधी मिळाली असती. तर आजही वेळ आली नसती. पुलवामा येथे केलेला हा भ्याड हल्ला होता आणि याचा निषेध आहे. भारतीय जवानांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. View this post on Instagram The reasons to be angered and hurt are plenty. The one that upsets me the most is that our men didn’t even get the chance to fight for themselves. The second photo is of a propagandist article that is celebrating this terrorist attack as a fight for freedom. It’s tragic and irresponsible that the truths of such a condemnable act are being distorted by the media to suit their political agendas. These men have been robbed of not just their lives but also the respect that they deserve as protectors of a nation. Let’s pray for the souls of our brave men and for the strength of their families. #jaihind A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on Feb 15, 2019 at 10:08pm PST दरम्यान, 'आपल्या जवानांवर करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याचा जाहीरपणे निषेध आहे. आता या हल्ल्याचं जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांनी केवळ त्यांचीच मुलं गमावली नाहीयेत.तर संपूर्ण देशाने आपल्या भावंडांना गमावलं आहे. त्यामुळे या हल्ल्याचं प्रत्युत्तर आपण द्यायलाच हवं. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे', असं अभिनेत्री दिशा पटानी म्हणाली. या कलाकारांव्यतिरिक्त गोल्डी बहल, कुणाल कपूर, ऋतिक रोशन या कलाकारांनीही सोशल मीडियावर जाहीर निषेध नोंदविला आहे. विशेष म्हणजे अभिनेता अमिताभ बच्चन यांनी या घटनेचा निषेध करत शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.