अभिषेक बच्चनच्या करिअरला नवसंजीवनी देण्यासाठी आता एक चित्रपट साकारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रपट आणि अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत फारशी उल्लेखनीय कामगिरी न करु शकणाऱ्या अभिषेकच्या करिअरसाठी अच्छे दिन आणणारा हा चित्रपट म्हणजे ‘मनमर्जिया’.

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जिया’ या चित्रपटातून एक प्रेकहाणी साकारण्यात येणार असून, उत्तर भारतातील प्रेमी युगुलाची कथा यातून सांगण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. नेहमीच सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या आणि त्यातूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अनुरागने यावेळी त्याच्या दिग्दर्शन कौशल्याला आव्हान देत नव्या कथानकाला हाताशी घेतले आहे. तेव्हा आता त्याच्या या प्रयोगशीलतेला यश मिळणार का, हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. अनुरागच्या प्रयोगशीलतेसोबतच या चित्रपटामध्ये अभिषेकचे अभिनय कौशल्यही पणाला लागणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

https://www.instagram.com/p/BdjnvAOj7Nm/

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

तापसी पन्नू, अभिषेक बच्चन आणि विकी कौशल अशी स्टारकास्ट असल्यामुळे प्रेक्षकांनाही या चित्रपटातून नव्या जोडीची केमिस्ट्री पाहता येणार आहे. पुढच्या महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. ‘मनमर्जिया’कडून आनंद एल राय यांनाही बऱ्याच अपेक्षा असल्याचे म्हटले जात आहे. राय यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे.