काहे दिया परदेस या मालिकेमुळे गौरी म्हणजेचं सायली संजीव ही आता महाराष्ट्रातील घराघरांत पोहचली आहे. दोन भिन्न संस्कृतींचा मिलाफ दाखविणा-या या मालिकेत सायली संजीव मुख्य भूमिका साकारतेयं. या मालिकेमुळे सायली इतकी प्रसिद्ध झालीयं की, ती रस्त्यावरून जात असतानाही जर कोणी आजी भेटल्या तर तिचे गौरी म्हणत गाल ओढतात आणि लाड करतात. अशा या लाडक्या गौरीच्या म्हणजेच सायलीच्या आवडीनिवडी जाणून घेऊया.
(छाया सौजन्यः सायली संजीव फेसबुक)