‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून अभिनेता सागर कारंडेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सागरने कधी त्याच्या विनोदातून डोळ्यांत पाणी येईपर्यंत प्रेक्षकांना हसवलंय तर कधी पोस्टमनकाका बनून प्रेक्षकांना रडवलंसुद्धा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या सागरने नाटकांतही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘जस्ट हलकं फुलकं’ या एकाच नाटकात त्याने सहा विविध भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांची गंमत आणि रंगभूमीवरील तयारी याविषयी सागरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

पाहा सागर काय म्हणाला?

माझ्या आयुष्यातील ‘माईलस्टोन नाटक’ अशा शब्दांत सागरने या नाटकाचं वर्णन केलं.