गेल्या महिनाभरापासून विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्याच लगच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. इटलीमध्ये पार पडलेल्या लग्नसोहळ्यानंतर विराट- अनुष्काने मुंबईत एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. मुख्य म्हणजे विवाहस्थळाविषयी कमालीची गुप्तता पाळणाऱ्या ‘विरुष्का’च्या स्वागत सोहळ्याच्या ठिकाणाविषयीसुद्धा बराच गोंधळ पाहायला मिळाला. या साऱ्याला निमित्त ठरला तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील आणखी एक खेळाडू. हार्दिक पांड्याचा भाऊ, कृणाल पांड्या. कृणालच्या लग्नसोहळ्यामुळे हे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाल्याचे वृत्त ‘स्पॉयबॉय ई’ने प्रसिद्ध केले.

मुंबईच्या ‘सेंट रेगिस हॉटेल’मध्ये विराट, अनुष्काच्या लग्नाच्या निमित्ताने स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पण, सुरुवातीला ‘जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल’मध्ये हा स्वागतसोहळा पार पडेल अशा चर्चा होत्या. याचे कारण असे की, या पंचतारांकित हॉटेलमध्ये २७ डिसेंबरला शर्मा कुटुंबियांच्या नावे एक बुकिंग करण्यात आली होती. पण, ही बुकिंग अनुष्काच्या नव्हे तर, कृणाल पांड्याच्या पत्नीच्या म्हणजेच पंखुरी शर्माच्या कुटुंबियांनी केली होती.

https://www.instagram.com/p/BdSMoNeBAIM/

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

एका क्रिकेटरच्या स्वागत समारंभाचे मॅरियट हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती सर्वांसमोर आली खरी. पण तिथे आयोजित करण्यात आलेला तो कार्यक्रम विराट, अनुष्काच्या लग्नाशी निगडीत नसून कृणाल पांड्याच्या लग्नाच्या निमित्ताने त्याचे आयोजन करण्यात आले होते. फक्त एकसारख्या आडनावांमुळेच हा सर्व गोंधळ झाला होता.