करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगातील लोक त्रस्त आहेत. या विषाणूने जगभरातील लोकांचे जीवन पार विस्कळीत करुन टाकले आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारतात तब्बल २१ दिवसांचे लॉकडाउन जारी केले आहे. दरम्यान देशभरातील लोक करोनामुळे आपल्या घरातच कैद झालेले असताना अभिनेत्री दीपिका पदुकोणने मात्र आपला ट्रॅव्हल प्लॅन जाहीर केला आहे.

या विकेंडला कुठे जाणार आहे दीपिका?

दीपिकाने या विकेंडसाठी केलेला तिचा टॅव्हल प्लॅन इनस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. खरं तर दीपिका घराबाहेर कुठेच जाणार नाही. तिने आपल्या घराचा नकाशा पोस्ट केला आहे. “हा नकाशा पाहून सांगा या विकेंडला मी सुट्टी घालवण्यसाठी कुठे जाऊ?” असा प्रश्न तिने आपल्या चाहत्यांना विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

Looking at the map for some weekend travel ideas… #travel #home

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiku Sharda (@kikusharda) on

दीपिकाच्या या प्रश्नावर अभिनेता कीकू शारदा याने तेवढ्याच गंमतीशीर अंदाजात उत्तर दिले आहे. त्याने दीपिकाच्या घरातील प्रत्येक खोलीला एक नाव दिले आहे. दीपिकाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय आहे करोना व्हायरस? कशी घ्याल काळजी

करोना व्हायरस सार्स’मध्ये (SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.

संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.