करोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये स्त्रियांवरील कौटुंबिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या तक्रारींची गंभीरपणे दखल घेत अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही या तक्रारींमध्ये घट झालेली नाही. दरम्यान स्त्रियांवर होणाऱ्या या अत्याचारांविरोधात टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिने आवाज उठवला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन स्त्रियांच्या समस्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

अवश्य पाहा – “त्यावेळी मी ड्रग्सचं व्यसन करत होते”; कंगना रणौतचा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

Ridiculed by the media, catcalled on the streets and now not even safe in their own homes. Society tweets about them but rarely ever lends a helping hand when they need it most. The last few months have been tough for us all, but especially for women who have no escape from the festering rage in their homes. If you know anyone who might be a target of domestic violence, then do take a look at our first ever PSA video that we shot under the challenging circumstances of this pandemic. And remember to please reach out – http://www.ncw.nic.in/helplines Directed and Produced by @bhavisha1603 & @dev_sahiba Writer: @areyohdeva Edited by @shewakaramani and @dbgh90 Actors: @divyaagarwal_official, @thegypsypanda and @maitri__dave #NoWomenNoCrime #NoWomenNoCry #DomesticViolence #DomesticViolenceAwareness #DomesticAbuse #StopDomesticViolence #DomesticViolenceSurvey #ShotFromHome #AbuseAwareness #EndTheStigma #BreakTheStigma #BreakTheSilence

A post shared by D I V Y A A G A R W A L (@divyaagarwal_official) on

काय म्हणाले होते गृहमंत्री?

“लॉकडाउनच्या काळात आपल्याला कोण अटक करणार? असा उद्दामपणा करीत महिलांवर अत्याचाराचे प्रकार होत आहेत. एकट्या स्त्रियांना त्रास देणे, त्यांचा विनयभंग करणे असे प्रकार जिथे घडतील तिथे कुठलाही मुलाहिजा न ठेवता अधिक कठोर कारवाई केली जाईल. घरगुती हिंसाचाराच्या (डोमेस्टिक व्हायलन्स) घटनांचीही अतिशय गंभीर दखल घेतली जाईल”, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता.

महाराष्ट्रात २४ हजार ८८६ नवे करोना रुग्ण

महाराष्ट्रात २४ हजार ८८६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ३९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. या संख्येमुळे महाराष्ट्रातील एकूण करोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत २८ हजार ७२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २ लाख ७१ हजार ५६६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.