विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला अभिनेता जितेंद्र जोशी केवळ एक उत्तम अभिनेताच नव्हे तर उत्तम कवीदेखील आहे. समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर तो कवितेच्या माध्यमातून व्यक्तही झाला आहे. त्यामुळे त्याच्या कविता तरुण वर्गात जास्त लोकप्रिय आहेत. अलिकडेच त्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने त्याच्या कविता लिखाणाचा नेमका प्रवास कसा सुरु झाला हे सांगितलं आहे.

कवितेच्या माध्यमातून जितेंद्र जोशी नेहमीच सद्यस्थितीवर, घडामोडींवर व्यक्त होत असतो, परखडपणे भाष्य करत असतो. विशेष म्हणजे जितेंद्र १० वीत असल्यापासून कवितेची रचना करत असल्याचं पाहायला मिळतं.