बॉलीवूड इंडस्ट्रीत सलमान खान त्याच्या दानशूर वृत्तीसाठी आणि मित्रांच्या मदतीला धावून जाण्यासाठी प्रसिद्ध आहे. संजय दत्त आज येरवाडा कारागृहातून सुटल्यानंतर सलमानच्या याच वृत्तीचा प्रत्यय आला. कारागृहातून सुटल्यानंतर संजय दत्त प्रसारमाध्यमांचा ससेमिरा आणि चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाला. यावेळी सल्लूमियाँने आपल्या मित्राच्या सुरक्षेसाठी मुंबई विमानतळावर त्याचे चार खास अंगरक्षक पाठवले होते. मुंबईत दाखल झाल्यानंतर संजय दत्तने आई नर्गिसच्या समाधीचे आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी हे अंगरक्षक संजय दत्तसोबत वावरत होते.