‘स्टार प्रवाह’च्या ‘गोठ’ या लोकप्रिय मालिकेने ५०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ५०० भाग पूर्ण केल्यानिमित्त मालिकेच्या सेटवर केक कापून जोरदार सेलिब्रेशनही करण्यात आलं. आता येत्या काही दिवसात मालिकेत आणखी रंजक वळण येणार आहे. त्यामुळे राधा विलासच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘गोठ’ ही मालिका  प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या मालिकेवर प्रेक्षकांनी आजवर भरभरून प्रेम केलं. विलास आणि राधाच्या जोडीबरोबरच बयो आजी, अभय म्हापसेकर या खलनायकी व्यक्तिरेखांदेखील लोकप्रिय ठरल्या. प्रेक्षकांनी तर सोशल मीडियाद्वारे या जोडीचं ‘विरा’ असं नामकरणही करून टाकलं. गेल्या दोन वर्षांत मराठी टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी ‘गोठ’ ही एक मालिका आहे. त्यामुळे या मालिकेचे ५०० भाग पूर्ण होणं हा निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन केक कापत हा आनंद साजरा केला.

suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा
sanket korlekar sister uma debut on star pravah new serial sadhi mansa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकली प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण; फोटो शेअर करत म्हणाला, “तू पहिल्यांदा टीव्हीवर…”

‘मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या प्रेमाच्या जोरावरच आतापर्यंतची वाटचाल झाली आहे. पुढेही आम्ही प्रेक्षकांना नक्कीच आनंद देत राहू, मालिकेचं कथानक अधिक रंजक करण्याचा प्रयत्न करणार आहोत’, अशी भावना विलास आणि राधा अर्थात समीर परांजपे आणि रुपल नंद यांनी व्यक्त केली आहे.