बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने ‘गली बॉय’ या चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. सिद्धांत फक्त त्याच्या अभिनयामुळे नाही तर शेर-शायरी आणि कवीतांसाठी देखील ओळखला जातो. तो एक उत्तम कवी देखील आहे. सिद्धांतने यावेळी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर एक कविता लिहली आहे. या कवितेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सिद्धांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सिद्धांतने करोनावर निर्माण झालेल्या परिस्थितीवर ही कविता केली आहे. ही कविता ऐकल्यावर प्रत्येक व्यक्ती ही भावूक होते. “खिड़की पर बैठते ही फिर वही गुजरती हैं एम्बुलेंस की आवाजें हर सेकंड जैसे कोई अपना आखिरी सांसें ले रहा हो”, अशा आशयाची कविता पोस्ट करत त्यांने वास्तव मांडलं आहे. सिद्धांतने ही कविता शेअर केल्यानंतर बॉलिवूड कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. दीया मिर्झा, कृती सॅनॉन, फरहान अख्तर, सियामी खेर सारख्या अनेक कलाकारांनी सिद्धांतच्या या कवितेवर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, सिद्धांतने पहिल्यांदाचा करोनावर कोणती कविता शेअर केली नाही. तर, गेल्या वर्षी देखील सिद्धांतने करोनावर एक कविता शेअर केली होती.

सिद्धांत लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धांतसोबत दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे दिसणार आहेत.