बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता कायमच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येत असतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर ते अनेकदा व्यक्त होत असतात. सध्या हंसल मेहता यांचं एक ट्विट नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अर्णब गोस्वामी घातक आहे की तांडव सीरिज असा प्रश्न त्यांनी नेटकऱ्यांना विचारला आहे हंसल मेहता यांनी अलिकडेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर नेटकऱ्यांना सर्वाधिक घातक कोण असा प्रश्न विचारला. सोबतच त्यांनी तीन पर्यायदेखील दिले. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रश्नांवर नेटकऱ्यांनी उत्तर देत त्यांची मत मांडली आहेत. Arnab or Tandav? Which is more dangerous? — Hansal Mehta (@mehtahansal) January 27, 2021 Rahul Kanwal or Abhishek Banerjee? Who is more dangerous? — Hansal Mehta (@mehtahansal) January 27, 2021 Deep Sidhu or Mohd. Zeeshan Ayyub? — Hansal Mehta (@mehtahansal) January 27, 2021 "अर्णब आणि तांडव? या दोघांमध्ये सगळ्यात घातक कोण?", असा प्रश्न त्यांनी नेटकऱ्यांना विचारला. या प्रश्नानंतर त्यांनी लागोपाठ अजून दोन प्रश्न विचारले. त्यात "राहुल कंवल की अभिषेक बॅनर्जी? या दोघांमध्ये कोण घातक वाटतो?", "दीप सिद्धू की मोहम्मद जीशान अय्यूब?, या सगळ्यात घातक नेमकं कोण वाटतं", असे तीन प्रश्न त्यांनी नेटकऱ्यांना विचारले. Kyunki Sir, #Arnab to Har Waqt #Tandav Karta Rahta Hai !pic.twitter.com/oOU1q97JuT — Aniket Sanghavi (@Aniket_Sanghavi) January 28, 2021 Arnab coz Tandav you can watch it once and can get bored but Arnab comes everyday to make us yawn with his same everyday rituals ! — Piyush Chamoli (@stifler_is_back) January 28, 2021 त्यांच्या या प्रश्नांवर नेटकऱ्यांनी भन्नाट उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अर्णब तर कायमच तांडव करत असतात, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, तांडव घातक आहे पण, अर्णब."असं अन्य एका युजरने म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तांडव या सीरिजवरुन बराच वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अर्णब गोस्वामी सातत्याने त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे.