प्रत्येक आई ही आपल्या मुलाच्या लग्नासाठी नेहमीच आनंदी, उत्साही असते. पण एकेकाळी अतिशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर मात्र मुलगा सैफ अली खानच्या लग्नासाठी उत्सुक नव्हत्या. त्यांनी स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे लग्न २०१२ साली झाले. ते दोघे लग्न करतायेत हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. आज दोघेही आनंदाने एकत्र राहत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. पण जेव्हा सैफचे लग्न झाले तेव्हा सैफची आई अभिनेत्री शर्मिला टागोर या उत्साही नव्हत्या. त्या मागचे कारण म्हणजे सैफचे वडील मंसूर अली खान पतौडी हे होते.

पाहा : ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिलात का?

सैफ आणि करीनाच्या लग्नाच्या एक वर्ष आधी मंसूर अली खान पतौडी यांचे निधन झाले होते. एका मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी सांगितले होते की त्या सैफच्या लग्नासाठी उत्साही नव्हत्या. तेव्हा त्यांना लग्नात काय परिधान करणार असे विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी हा आनंदाचा क्षण आहे मी काय परिधान केले आहे याने काही फरक पडत नव्हता. त्यामुळे मी माझ्या कलेक्शनमधील एक जूनी साडी नेसली होती असे म्हटले होते.

पुढे त्या म्हणाल्या त्यावेळी सैफ आणि करीनाच्या लग्नासाठी मी उत्सुक दिसत नव्हते कारण माझ्या पतिच्या निधनाला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते. पण कुटुंबातील इतर सदस्य उत्सुक होते.

सप्टेंबर २०११ मध्ये मंसूर अली खान पतौडी यांचे निधन झाले होते. त्यावेळी करीना कपूर देखील तेथे उपस्थित होती. ऑक्टोबर २०१२मध्ये सैफ अली खान आणि करीन कपूरचे लग्न झाले.