सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला अखेर जामिन मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर तिची न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्यात आली आहे. रियाची सुटका होताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान अभिनेता फरहान अख्तर याने रियाची बाजू घेत टीकाकारांवर निशाणा साधला आहे. आता तरी तुम्ही रियाची माफी मागणार का? असा सवाल त्याने केला आहे. अवश्य पाहा - “चाप ओढला अन् कान सुन्न झाले”; ‘मिर्झापूर २’साठी अभिनेत्रीने केली खरीखुरी ‘शुटिंग’ "रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप करणारे वृत्त निवेदक आता तरी माफी मागणार का? मला वाटत नाही ते मागतील. पण त्यांनी आता आपला विषय बदलायला हवा. तेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल." अशा आशयाचं ट्विट करुन फरहानने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अवश्य पाहा - शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स; किंमत पाहून तुम्हाला येईल चक्कर Any shrill anchors apologising for the hell they put #RheaChakraborty and her family through? Didn’t think so. But watch them shift the goalpost now .. they’re notorious for that. — Farhan Akhtar (@FarOutAkhtar) October 7, 2020 रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला असून जामीन मंजूर करण्यात आला आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियाची सुटका करताना कोर्टाने सांगितलं आहे की, “रियाने सुटकेनंतर दर १० दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं”.