बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी प्रेक्षक ते तितक्याच आवडीने आजही पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ९ वर्षे उलटली असली तरी चाहते तितक्याच आनंदाने आजही पाहतात. या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्कि कोचलिन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील हृतिक, अभय आणि फरहान या तिघांच्या मैत्रीच्या विशेष चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. नुकताच अभय देओलने या चित्रपटातील एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाची निर्माती जोया अख्तरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चित्रपटातील एक सीन दाखवण्यात आले आहेत. या सीनमध्ये हृतिक, फरहान आणि अभय बार्सिलोना ते कोस्टा ब्रावा प्रवास करत असतात. हृतिक गाडी चालवत असतो. दरम्यान हृतिकला ऑफिसमधून एक फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी तो गाडी घाटात रस्त्याच्या बाजूला लावतो आणि गाडीतून खाली उतरतो. पण हृतिक गाडीतून उतरताना गाडी बंद करायला विसरतो. हृतिक खाली उतरताच गाडी पुढे सरकते. फरहान गाडीतून उडी मारतो आणि गाडीत बसलेला अभय घाबरतो. पण हृतिक पटकन येऊन गाडी बंद करतो.

आणखी वाचा : न्यूड क्लिप लीक होण्याविषयी राधिका आपटे म्हणते…

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Baby (@tigerbabyfilms)

व्हिडीओमध्ये अभय बोलता की, ‘हृतिकमुळे मी आणि फरहान मरणारच होतो. फरहान खूप फास्ट आहे. तो गाडी पुढे सरकत आहे हे पाहून तातडीने उडी मारतो आणि मी मरणार हाच विचार करत बसलो होतो.’

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचे जोया अख्तरने दिग्दर्शन केले आहे. तसेच चित्रपटाला म्यूझिक शंकर एहसान लॉयने दिले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.