‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी त्याची चर्चा अजूनही थांबलेली नाही. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं कौतुक प्रेक्षक-समीक्षकांकडून झालं. आता बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने हा चित्रपट पाहिला आणि त्याची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. हृतिकने ट्विट करत अजय देवगण व संपूर्ण ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या टीमची वाहवा केली आहे.

‘आताच ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला. अतुलनीय चित्रपट आहे. सर्वोत्तम साहसदृश्ये पाहायला मिळाली. अजय देवगण काजोल यांचं अभिनय पाहून त्यांना नमन करावंस वाटतंय. सैफ अली खाननेही उत्तम कामगिरी केली. संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांची जितकी स्तुती करावी ती कमीच आहे. नेहा शर्माचंही अभिनय दमदार होतं. अप्रतिम चित्रपट आहे’, अशा शब्दांत हृतिकने स्तुतीसुमने वाहिली.

actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
shahid-kapoor-rang-de-basanti
‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”
sooraj-barjatya
जेव्हा सूरज बडजात्या अभिषेक व करीनावर उखडले; दिग्दर्शकानेच सांगितला किस्सा, म्हणाले “मी माईक फेकला…”
naseeruddin-shah-bollywood
“मी हिंदी चित्रपट बघतच नाही कारण…”, नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली बॉलिवूडविषयी नाराजी

हृतिकचे हे ट्विट पाहून अजयनेही आनंद व्यक्त केला. ‘तान्हाजी’ या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली असल्याचं त्याने सांगितलं.

पाहा व्हिडीओ : डॉ. अमोल कोल्हेंनी उलगडली मालिकेसोबत झालेल्या राजकारणाची गोष्ट

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.