भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात ऐतिसहासिक विजयाची नोंद करत भारताने मालिका खिशात घातली. अनेक आव्हानांचा सामना करत भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने देखील आनंद व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने मिळवलेल्या विजयानंतर शाहरूखने ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. “आपल्या संघाचा हा आश्चर्यकारक विजय आहे!!! या विचाराने मी रात्र भर झोपू शकलो नाही. आता शांततेत मी थोडा वेळ झोपेल. सगळ्या खेळाडूंना खूप प्रेम त्यांच्या चिकाटीवृत्तीमुळे मिळालेल्या विजयाची मी प्रशंसा करतो. चक दे इंडिया!” अशा आशयाच ट्वीट शाहरूखने केले आहे.

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत (८५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासाह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia brisbane test victory india shahrukh khan congratulate them on twitter dcp 98 avb
First published on: 19-01-2021 at 17:08 IST