कोणाची आहे ही चाहूल? कोणाला मान्य नाही हा साखरपुडा?

कलर्स मराठीवर चाहूल ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेमधील जेनी ही अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. तर मालिकेमध्ये वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या कॅमेरा टेकनिक्समुळे प्रेक्षकांना ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी वाटत आहे. मालिकेच्या कथानकाबद्दल तर उत्कंठा आहेच पण आता एक वेगळीच चाहूल लागली आहे. जेनी आणि सर्जेराव यांच्या साखरपुड्याचा विचार घरच्यांच्या मनात आला आहे, यासाठी जेनी आणि सर्जेराव उत्सुकदेखील आहेत. पण हे सगळ होत असताना सर्जेरावांना एक प्रश्न पडलाय की त्यांची बालपणाची मैत्रीण निर्मला गेली कुठे? तिचा पत्ता कुठेच लागत नाहीये. त्यावर बबन्यादेखील गायब आहे. हा बबन्या सर्जाला मिळेल का? निर्मला कुठे गेली आहे हे त्याला कळेल का? हे सगळेच निरुत्तरित प्रश्न आहेत. ज्यांनी प्रेक्षकांना या मालिकेत खिळवून ठेवले आहे.

हे सगळे होत असताना, सर्जाला अनेक लहानपणीच्या आठवणी आठवत आहेत. त्या तो जेनीला सांगून निर्मलाबद्दलच्या आठवणींना उजाळा देतो आहे. ह्या निर्मलेला सर्जा निरररररररमला अस बोलवतो. तसेही लहानपणीची मैत्री ही नेहेमीच जवळची असते यात शंका नाही. इतकी जवळची मैत्रीण कुठे गेली याची काळजी सर्जाला अस्वस्थ करत आहे. सर्जाच्या घरच्यांपैकी निर्मला गायब होण्यामध्ये कोणाचा हात आहे का? असेल तर कोण आहे ? असे प्रश्न असताना, जेनीला गावात आल्यापासून बराच त्रास होत आहे. तिच्या बरोबर विचित्र अश्या गोष्टी घडत आहेत. गावामध्ये बऱ्याच विषयांवरून चर्चा होत आहे, हे सगळ बंद करण्यासाठीच सर्जाच्या घरचे जेनी आणि सर्जाचा साखरपुडा ठरवतात. दरम्यान, सर्जा आणि जेनीचा साखरपुडा करणा-या गुरुंजीचा खून होणार आहे. या गुरुजींच्या खूनामागे कोणाचा हात असेल? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सोमवारीच्या भागात कळेल.

या साखरपुड्यामध्ये अडथळे कोण निर्माण करत आहे ? सर्जा आणि जेनीचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल का ? बबन्या सर्जाला निर्मला कुठे आहे हे सांगू शकेल का ? जेनीला आणि सर्जाला दूर करण्याचा प्रयत्न कोण करत आहे आणि का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला चाहूल ही मालिका पाहावे लागेल.