ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानचा ‘रेस ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलमानसोबतच या चित्रपटात अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, डेझी शाह, बॉबी देओल, साकिब सलीम अशी स्टारकास्ट होती. बॉक्स ऑफीसवर जरी या चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असला तरी कथेच्या बाबतीत मात्र ‘रेस २’ने मार खाल्ला. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला विशेष दाद मिळाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रेस ३’ चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसूझाने केलं होतं. या चित्रपटाच्या अपयशाबद्दल तो प्रथमच व्यक्त झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, ‘चित्रपटाच्या कथेत बऱ्याचदा बदल केले गेले. सलमान खानच्या एण्ट्रीनंतर हे बदल केले गेल आणि याचाच फटका चित्रपटाला बसला.’

वाचा : ‘सीता भी यहाँ बदनाम हुई’; महेश भट्टवरून ट्रोल करणाऱ्यांना रियाचं सडेतोड उत्तर

‘रेस ३’च्या अपयशाचं खापर आपल्या डोक्यावर फोडल्याने साहजिकच सलमानचा राग अनावर झाला. सलमानने यापुढे कधीच रेमोसोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. यामुळेच ‘रेस ४’ चित्रपटातून रेमो डिसूझाचा पत्ता कट झाल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वीच निर्माते रमेश तौरानी यांनी ‘रेस ४’ चित्रपटाची घोषणा केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is salman khan furious with remo dsouza over his comments on race
First published on: 23-09-2018 at 17:06 IST