चाहत्यांना चांगले चित्रपट देणे ही माझी जबाबदारी असल्याचे अभिनेता रणबीर कपूर याने सांगितले. याअगोदरचे माझे काही चित्रपट यशस्वी ठरले नव्हते. त्यामुळे माझ्या काम करण्याच्या दृष्टीकोनात कोणताही फरक पडला नसला तरी लागोपाठच्या अपयशामुळे माझे चाहते निराश झाले याबद्दल मला वाईट वाटते. त्यामुळे आगामी काळात मी अधिकाअधिक चांगले काम करण्याचा करून पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करेन, असा विश्वास यावेळी रणबीरने व्यक्त केला.
याशिवाय, एखाद्या अभिनेत्याने विशिष्ट प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडू नये असेही रणबीरने यावेळी सांगितले. आम्हा अभिनेत्यांना एकाचप्रकारच्या भूमिका करायला आवडत नाहीत. सध्या अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतात. आमच्यासाठी हा चित्रपसृष्टीतील सर्वोत्तम काळ असल्याचे रणबीरने सांगितले. रणबीर कपूरचा ‘तमाशा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, आगामी काळात ‘जग्गा जासूस’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्ये रणबीर पहायला मिळणार आहे.