छोट्या पडद्यावरील 'कुमकुम' या लोकप्रिय मालिकेतून प्रकाशझोतात आलेल्या जुही परमारने नुकताच पती सचिन श्रॉफबरोबर घटस्फोट घेतला आहे. 'कुमकुम' मालिकेमुळे जमलेली ही जोडी अचानक विभक्त का झाली या मागचं कारण स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळे या घटस्फोटाविषयी अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत होत. मात्र आता या साऱ्यावर जुहीने आपल मौन सोडलं असून तिने घटस्फोट घेण्यामागचं कारण जाहीर केलं आहे. १८ महिन्यांपासून विभक्त राहणारी ही जोडी कायदेशीररित्या आता वेगळी झाली असून त्यांनी ९ वर्षांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. जुही-सचिन जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्या वेगळ होण्यामागचं खरं कारण स्पष्ट झालं नव्हत. त्यामुळेच जुहीने एक भावनिक पोस्ट करत घटस्फोट घेण्यामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे. 'सतत होणाऱ्या प्रश्नांमुळे अणि टीकांमुळे आज मला मौन सोडावं लागत आहे. सचिन आणि मी या घटस्फोटाबाबत कुठेच काही बोलणार नाही किंवा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार नाही असं ठरवलं होतं. मात्र आता मला पुन्हा एकदा बोलाव लागत आहे. आमचं नातं तुटलं कारण ते नातं कधी निर्माण झालंच नव्हतं. सचिनने त्याच्या भावना माझ्यासमोर व्यक्त केल्यानंतर लगेच आम्ही लग्न केलं. त्यावेळी माझ्या मनात कोणतीही प्रेमभावना नव्हती.पण माझा तो एक निर्णय चुकला आणि आज आम्हाला हा दिवस पाहावा लागत आहे. लग्नानंतरही माझ्या मनात सचिनविषयी प्रेम निर्माण होईल असं मला वाटत होतं. मात्र तसं काहीच झालं नाही. मात्र तरीदेखील मी हे नात टिकविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही', असं जुहीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जुही-सचिनची मुलगी समायरा हिच्या जन्मापूर्वी पासून या दोघांमध्ये वाद सुरु होते. मात्र समायराच्या जन्मानंतर काही काळ लोटल्यानंतर त्यांच्या नात्यातील दुरावा कमी झाला होता. ते दोघही संगनमताने विभक्त रहात असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे खुद्द जुहीनेच 'जज्बात' या कार्यक्रमादरम्यान घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.