करोना वायरसने चीनमध्ये अक्षरश: थैमान घातला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत २० हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आणि आता तर हा वायरस जवळजवळ २५ देशांमध्ये पसरला आहे. सुदैवाने या घातक विषाणूचा फटका आपल्या देशाला बसला नाही. परंतु अभिनेता कमाल खान मात्र यामुळे नाराज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारतातही करोना वायरसची लागण व्हावी यासाठी तो देवाकडे प्रर्थना करत आहे. काय म्हणाला केआरके? बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला कमाल खान उर्फ केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. यावेळी त्याने करोना वायरसबाबत ट्विट केले आहे. "करोना वायरस लवकरात लवकर भारतात यावा अशी प्रर्थना मी देवाकडे करतो. असे झाल्यास देशातील लोक हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन असे धार्मिक मतभेद सोडून एकत्र येतील. आणि करोना वायरसशी झुंज देतील." अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे. I pray to GOD for the #caronavirusoutbreak in India as soon as possible. May be, we all Hindu Muslim Sikh Christians become brothers again to fight against #coronavirus! — KRK (@kamaalrkhan) February 29, 2020 कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान काही जणांनी तर, भारतीयांना एकत्र येण्यासाठी करोना वायरसची गरज नाही. असे म्हणत उलटी टीका केआरकेवरच केली आहे. काय आहे कोरोना व्हायरस? कशी घ्याल काळजी? कोरोना व्हायरस सार्स’मध्ये(SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत. संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.