नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. या आंदोलनाला इतर कलाकारांसोबतच अभिनेता कमाल आर. खान याने देखील पाठिंबा दिला आहे. जर शेतकरीच नाही राहिले तर दगड अन् माती खाऊन जिवंत राहाल का? असा सवाल त्याने सरकारला केला आहे. अवश्य पाहा - 'शेतकरी पिझ्झा का खावू शकत नाही?'; ट्रोलर्सला स्वरा भास्करचा संतप्त सवाल अन्न दाता किसान ही नहीं रहेगा, तो क्या खाकर ज़िंदा रहोगे? ईंट पत्थर? शरम करो और अपने अन्न दाता से हाथ जोड़कर माफ़ी माँग लो! #KisanEktaZindabad! — KRK (@kamaalrkhan) December 14, 2020 अवश्य पाहा - बेरोजगारीमुळे निराश झालेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "अन्नदाता शेतकरी नाही राहिला तर काय माती आणि दगड खाऊन जिवंत राहणार आहात का? हात जोडून आपल्या अन्नदाताची माफी मागा. आम्ही शेतरकरी होतो, आहोत आणि शेवटपर्यंत शेतकरीच राहू. तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणा किंवा दहशतवादी. लक्षात ठेवा मत मागायला याल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू." अशा आशयाची दोन ट्विट्स करुन केआरकेने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याची ही ट्विट्स सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अवश्य पाहा - आई म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला सनी लिओनीचं प्रत्युत्तर; म्हणाली, हा मुलगा तर. हम किसान थे, किसान हैं और मरते दम तक किसान ही रहेंगे! आप चाहे हमको देशद्रोही बुलाओ या आतंकवादी! और याद रखना, तुम कल फिर हमसे से ही वोट की भीक माँगने आओगे! #FarmersAreLifeLine — KRK (@kamaalrkhan) December 13, 2020 अवश्य पाहा - "हॅण्डल विथ केअर नाहीतर."; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा शेतकरी आंदोलन आणखी पेटणार! केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता अधिकच तीव्र होत आहे. आज आंदोलनाचा १७ दिवस होता मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने, शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एवढच नाहीतर आता आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र करण्याचा इशाराही एकप्रकारे देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व शेतकरी संघटनांचे नेते १४ डिसेंबर रोजी एकाच व्यासपीठावर उपोषणास बसणार असल्याचे आज संयुक्त किसान आंदोलनचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू यांनी सांगितले आहे.