प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या दाव्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला अभिनेत्री कंगना राणावतने सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

गेल्याच आठवड्यात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी कंगनाविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलीवूडमधील घराणेशाही सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा दावा केला होता. तिने अख्तर यांच्यावरही आरोप केले होते. त्यामुळे अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे बदनामी झाल्याची तक्रार केली होती. कंगनावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे अख्तर यांच्या तक्रारीवर अहवाल सादर करताना पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ती हजर न झाल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात टक वॉरंट बजावले होते.