अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कंगनावर जोरदार टीका करण्यात आली. अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं. दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने तर कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या टीकेवर आता कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही मला महान बनवूनच शांत बसणार आहात का? असा उपरोधिक टोला तिने आपल्या विरोधकांना लगावला आहे.

अवश्य पाहा – ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजितमध्ये जुंपली

“चित्रपट माफियांनी माझ्याविरोधात केस दाखल केली आहे. जावेद अख्तर यांनी देखील माझ्या विरोधात तक्रार केली. महाराष्ट्र सरकार तर प्रत्येक तासाला माझ्याविरोधात केस दाखल करत असते. आता या टोळीत कॉग्रेस देखील सामिल झालं आहे. असं वाटतंय ही मंडळी मला महान बनवूनच शांत बसणार आहेत. अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपल्या विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.” तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वधून घेत आहे.

अवश्य पाहा – अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

शेतकरी आंदोलन: ‘त्या’ आजींविषयी ट्विट करणं कंगनाच्या अंगलट

शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.