बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावरून केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना चर्चेत आली होती. आता कंगनाने एक ट्वीट करत तिला कलाकर म्हणून काम करताना कशाची भीती वाटते ते सांगितले आहे.

“घराणेशाही आणि मुव्ही माफीया यांच्या व्यतिरिक्त कलाकार असण्याची सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे नाइट शिफ्टमध्ये काम करणे आहे. जेव्हा सुर्योदय होतो तेव्हा आपण झोपतो त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलतात. सुरूवातीला रात्री काही दिवस मला भूक लागत नव्हती आणि मन सारखे विचलीत होत होते. आता माझ्या शरीराला याची सवय होईल याचीच वाट बघते” अशा आशयाच ट्वीट कंगनाने केलं आहे.

आणखी वाचा- १०६ दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर या कारणामुळे अचानक एजाज खान पडला घराबाहेर

कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा ‘तेजस’ आणि ‘धाकड’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.