ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या बेधडक आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जातात. चित्रपटसृष्टीत अनेकांना त्यांच्या अशा स्पष्टवक्तेपणाची भीतीही वाटते. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसुद्धा त्यांना घाबरतो आणि याचा खुलासा त्याने स्वत: एका टॉक शोमध्ये केला. ‘जया बच्चन यांना आपल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी बोलवायला मला भीती वाटते. त्या कधीही खोटं बोलत नाहीत. म्हणूनच त्यांच्या स्पष्ट वक्त्या आणि रोखठोक भूमिकेमुळे दिग्दर्शक त्यांना घाबरतात,’ असं त्याने सांगितलं.

या टॉक शोमध्ये करणने त्याचं खासगी आयुष्य आणि बॉलिवूड याबद्दल बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. जया बच्चन यांच्याबद्दल तो म्हणाला की, ‘त्यांना स्क्रिनिंगसाठी बोलावताना अनेकदा विचार करावा लागतो. त्यांचं परखड मत ऐकून घ्यायची तयारी ठेवावी लागते. त्या एकदम रोखठोक प्रतिक्रिया देतात.’

VIDEO : समंथा-नागा चैतन्यचं सेलिब्रेशन अजूनही सुरूच

स्क्रिनिंगसाठी बोलावलं तर त्या काय म्हणतात हेसुद्धा त्याने यावेळी सांगितलं. ‘मला खोटं बोलणं जमत नाही. त्यामुळे मी स्क्रिनिंगला न आलेलंच बरं. मला चित्रपट नाही आवडला तर मी स्पष्ट सांगून टाकेन आणि तू नाराज होशील असं त्या थेट सांगतात.’ हे सांगून जया बच्चन यांनी अनेकदा आपल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला यायला नकार दिल्याचं करणनं सांगितलं.

वाचा : ..जेव्हा मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स एकत्र येतात