करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टीव्ही अभिनेता करण ठक्कर कुटुंबीयांसह मुंबईहून लोणावळ्याला राहायला गेला. मुंबईमधली अंधेरी इथल्या त्याच्या राहत्या इमारतीत पाच करोना रुग्ण आढळल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. वृद्ध आईवडिलांच्या आरोग्याची काळजी करत त्याने हा निर्णय घेतला आहे.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, “मी राहत असलेल्या इमारतीत अनेक करोनारुग्ण आढळले. त्यामुळे मी शहराबाहेर जाण्याचा विचार केला. माझ्या आईवडिलांच्या तब्येतीची मला जास्त काळजी आहे. सुदैवाने आम्ही सर्वजण सुखरुप आहोत.” यादरम्यान शूटिंगला जावं लागल्यास पुन्हा मुंबईला येईन असं त्याने सांगितलं. मात्र लोणावळ्याला गेल्यानंतर क्वारंटाइनमध्ये राहणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Tacker -Agent Farooq Ali (@karantacker) on

आणखी वाचा : “टीव्हीने माझ्यावर बंदी आणली म्हणून बॉलिवूडकडे वळलो”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

करणने २००९ मध्ये ‘लव्ह ने मिला दी जोडी’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. कलाविश्वात त्याने नुकतीच ११ वर्षे पूर्ण केली आहेत.