छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘कसौटी जिंदगी की २’. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथान सर्वात जास्त चर्चेत होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पार्थने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले आहे.

एका मुलाखतीत पार्थ समथान ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या त्याच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी पार्थने त्याच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला. “मी सिंगल आहे आणि आनंदी आहे. पण आता मला असं वाटतं की आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती असायला हवी कारण सध्याची परिस्थिती खूप कठिण आहे,” असं पार्थ म्हणाला.

“कोणासोबत रिलेशनशिपमध्ये यायला आवडेल का?” असा प्रश्न पार्थला विचारण्यात आला. “हो नक्कीच,” असे उत्तर देत रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी तो तयार असल्याचं पार्थने सांगितलं आहे.

पुढे करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर पार्थ म्हणाला, “मला आशा आहे की लवकरचं सगळं पूर्वपदावर येईल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन जीवनात येऊ आणि खूप मोठ मोठी कामं करु.”

पार्थने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने ‘यह है आशिकी’, प्यार तूने क्या किया, सावधान इंडिया, कैसी है यारियां सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेती अनुरागच्या भूमिकेने त्याला खरी लोकप्रियता मिळाली.