जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढय़ांना गाणं म्हणजे काय, हे कळलं, संगीतविश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वराचं देणं’ मानत वंदन करतात, त्या स्वरसम्राज्ञी  लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याला ५१ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने लतादीदींनी गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला.
लतादीदी भावूक मनाने म्हणतात, “मला खरचं माहीत नाही ही ५१ वर्षे कशी उलटली परंतु, त्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. मी हे गाणे २७ जानेवारी १९६३ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितत गायले होते. त्यावेळी सर्वांचे पाणावलेले डोळे आजही मला आठवतात. हे मर्मभेदक गाणे प्रदीपजींनी लिहीले होते. तर, रामचंद्रजींनी संगितबद्ध केलेले. आपण देशासाठी प्राण दिलेल्या हुतात्म्यांना जसे कधीच विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे या गाण्याच्या आठवणी मी कधीच विसरू शकत नाही.”
१९६२ सालच्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजलीपर हे गाणे त्यावेळी दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थित गायले होते. आज ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं यांच्या उपस्थित लता मंगेशकरांनी या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
udayanraje bhosale yashwantrao chavan marathi news
“यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले”, खासदार उदयनराजेंचे गौरवोद्गार