बॉलिवूडमध्ये एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली मल्लिका शेरावत सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मल्लिका आणि तिचा पती सिरिल ऑग्जनफॅन्स यांनी घरभाडे थकवल्यामुळे त्यांना मालकाने घरातून हकलवल्याचे वृत्त शुक्रवारपासून चर्चेत होते. हे दोघं पॅरिसमधील एका अपार्टमेन्टमध्ये राहत होते. दोघांनी ८० हजार युरो म्हणजे साधारणपणे ६४ लाख रुपयांचे भाडं अजूनपर्यंत दिलं नसल्याचे म्हटलं जातंय.

वाचा : कंडोम जाहिरात बंदीवर रिचा चड्ढा म्हणते..

मल्लिकाविषयी आलेल्या काही वृत्तांमध्ये सिरिल हा तिचा प्रियकर असल्याचे तर काहींनी तो तिचा पती असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण घटनेवर मल्लिकाने तिची बाजू मांडली. ती म्हणाली की, ‘मी पॅरिसमध्ये राहत नाही आणि मी तिथे भाड्याने कोणतंच अपार्टमेण्टही घेतलेलं नाही. या सगळ्यात माझं नाव का घेतलं जातंय हेच मला कळत नाही. माझ्या कुटुंबासह लॉस एन्जेलिसमध्ये राहिल्यानंतर आता मी मुंबईत आले आहे. ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही ते माझ्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर पोस्टही पाहू शकतात.’

वाचा : अनुष्का शर्माच्या भावाला लग्नाचे आमंत्रणच नव्हते!

गेल्या वर्षी मल्लिकावर याच अपार्टमेण्टमध्ये काही अज्ञांतांनी हल्ला केला होता. त्याचाच राग म्हणून तिने घरभाडे न दिल्याचे मल्लिकाचा वकील ऑलिव्हर मेरॅण्ड याने एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला सांगितले होते. त्यावर मल्लिका म्हणाली की, ‘मला खरंच धक्का बसला आहे. ऑलिव्हर मेरॅण्ड नावाच्या व्यक्तीला मी ओळखतही नाही. तसेच, माझी बाजू मांडण्यासाठी मी कोणत्याही वकिलाची नियुक्ती केलेली नाही. ते माझं अपार्टमेण्ट नाही. त्यामुळे भाडं देण्याचा किंवा मला घरातून हकलवण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच, सिरिल हा माझा नवरा नाही. सगळेजण माझ्या खासगी आयुष्यात का डोकावत आहेत? तुम्ही सिरिलचा उल्लेख माझा मित्र म्हणूनही करू शकता ना.’

मल्लिकाने प्रियकराशी लग्न केल्याचीही चर्चा यापूर्वी रंगली होती. मात्र, तिने हे वृत्त फेटाळून लावले होते. अशा अफवा पसरवणे बंद करा. जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मी सगळ्यांनाच आमंत्रण देईन, असे ती म्हणाली होती. पण मल्लिकाच्या वडिलांनी एका मुलाखतीत तिने लग्न केल्याचे म्हटले होते.