‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या निमित्ताने भगवान श्री राम यांच्या जन्मस्थळी अयोध्या येथे भोजपुरी कलाकारांनी 'रामलीला' या नाटकाचं सादरीकरण केलं. या नाटकात भाजपा नेते मनोज तिवारी यांनी 'अंगद' ही व्यक्तिरेखा साकारली. लक्षवेधी बाब म्हणजे ही पौराणिक व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी चुकून 'एक सेंकद थांबा' हे वाक्य उच्चारलं. परिणामी या वाक्यामुळे त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. HINDI KA APMAAN MANOJ TIWARI se ye bhi na ho paaya. pic.twitter.com/xMbevg971C — Gabbar 3.0 (@jay_bhadrakali6) October 23, 2020 देशभरात करोनाचं सावट असल्यामुळे प्रेक्षकांना या नाटकाचा आनंद ऑनलाईनच घ्यावा लागला. दरम्यान या नाटकामध्ये 'रावण' आणि 'अंगद' या दोन पात्रांचं संभाषण सुरु होतं. तेवढ्यात रावणाशी संभाषण करताना मनोज तिवारी चुकून आपल्या बोली भाषेत 'एक सेकंद थांबा' असं म्हणाले. या चकित करणाऱ्या वाक्यामुळे प्रेक्षक आवाक् झाले. काहींनी तर पौराणिक नाटकात इंग्लिश कुठून आलं? असा प्रश्न विचारत मनोज तिवारी यांची फिरकी घेतली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. Ravan: 1 Second, 1 Second. Oscar level performance. — El Camino (@Siddiiqui_says) October 23, 2020 "एक सेकेंड एक सेकेंड, हनुमान हमारी टीम मे हैं।" कैसो कैसो को अभिनय दे दिया जाता है रामलीला मे। साफ साफ हिंदी तक नही बोल पाते। ना अंगद की अच्छी वेशभूषा। @UPGovt #मनोजतिवारी #ManojTiwari #Ayodhya #Ramleela pic.twitter.com/yNitHcSovH — दीपक सिंह 'ओ३म्' (@DeepakSinghSir) October 23, 2020 @ManojTiwariMP Ji आप तो एक सेकंड एक सेकंड मैं पूरी राजनीति खेल ली पहले रामलीला तो खेल लेते.#ayodhyaramleela #manojtiwari @sudhirchaudhary @ZeeNews @PMOIndia @myogiadityanath @ravishndtv @ — Vipin Anand Gusain (@VGusain23) October 23, 2020 इसके बस का कुछ नही है.. 1 सेकंड 1 सेकंड — DANISH IQBAL (@iqbaaldaanish) October 24, 2020 नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.