मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंद कुलकर्णी यांचे गुरूवारी कोल्हापूर येथे निधन झाले. बन्या बापू, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, अशी रंगली रात्र, अंगार, शपथ तुला बाळाची, मर्दानी, दैवत अशा अनेक चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, लेखक म्हणून त्यांची चित्रपटसृष्टीत ओळख होती.