करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येक दिवशी देशात आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारतर्फे नागरिकांनी घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. गर्दीची ठिकाणं टाळा असे सल्ले वारंवार देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात काल जनता कर्फ्यू पाळला गेला. मात्र संध्याकाळी पाच वाजता याला काहीसं गालबोट लागलंच. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचं कौतुक करण्यासाठी काही भागांमध्ये लोकं गर्दी करुन रस्त्यावर उतरली होती. लोकांमध्ये या विषाणूविषयी जनजागृती वाढावी यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत.

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही आपल्या फेसबूक पेजवर एक सुंदर कविता सादर करत सर्वांना या काळात घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त वेळ घरात राहून आपण सरकारी यंत्रणांना मदत करु असं आवाहन संकर्षणने केलं आहे. एका संकर्षणची कविता…

Sanjay nirupam
“जावयाचं सासुरवाडीवर जास्त प्रेम असतं”, संभाव्य उमेदवारीला विरोध झाल्याने संजय निरुपमांची खोचक पोस्ट; म्हणाले…
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

महाराष्ट्रातही करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतोना दिसत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व सुविधा बंद केल्या आहेत. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.